Get in on
लोणावळा : ज्येष्ठ गायिका पद्मश्री स्वर्गीय सुमन कल्याणपुरकर यांना लोणावळा शहरातील कार्यकारी संगीतमय आदरांजली समर्पित केली आहे. लोणावळा शहरातील निवडक 10 गायकांनी स्व. सुमन कल्याणपूर यांच्�
लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुसगाव-लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उ�
लोणावळा : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवाल या २५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव अखेर पोलिसांनी उधळून लावला आहे. केतनचा मृत्यू अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला खूनाचा थरारक कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा केला होता बनावपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत केतन विशाल अगरवाल (वय २५, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) याचे सिया प्रविण बसेसवर गोयल (रा. मार्केट यार्ड, पुणे) हिच्यासोबत लग्न ठरले होते. 19 फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुढा झाला होता. १८ जून २०२६ रोजी हे दोघे लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपामध्ये केतनचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी, किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरला आणि तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती सिया गोयल हिने दिली होती. त्यानुसार सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (रजिस्टर नं. ३६/२०२६ बी.एन.एस.एस. १९४) नोंद करण्यात आली होती.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संशयावरून सखोल तपासघटना प्रथमदर्शनी संशयास्पद वाटल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश देत दोन विशेष पथके तैनात केली. प्रॉपर्टीचा वाद किंवा प्रेमसंबंध या बाजूने पोलिसांनी तपास सुरू केला असता, मुलीचे म्हणजेच सियाचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६) यांनीही सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने संगणमत करून केतनला किल्ल्यावरून ढकलून मारल्याची फिर्याद दिली. त्यावरून २३ जून २०२६ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.असा रचला खूनाचा कट…स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून शोध घेत प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, सियाचे लग्न केतन अगरवालसोबत ठरले होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. यामुळे दोघांनी केतनचा काटा काढण्याचा कट रचला. योजनेनुसार, सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि प्रियकर चेतन चौधरी यालाही पाठीमागून तिथे बोलावून घेतले. संधी साधून दोघांनी केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले आणि त्याचा खून केला.एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 3 वेळा केतनला लोहगडावर नेहलेसिया अग्रवाल हिने एक दोन वेळा नव्हे तर 20 दिवसात तब्बल तीन वेळा केतन अग्रवाल याला लोहगडावर नेहले होते अशी माहिती केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिली. त्याला मारण्याचा कट हा पूर्वनियोजित होता. लग्नची मागणी त्यांनीच घातली होती व सियाला लग्न करायचे नव्हते तर तसे सांगायचे होते, आम्ही लग्न रद्द केले असते. आज आमचा एकुलता एक मुलगा गेला, आम्ही काय करायचे, आम्हाला न्याय मिळावा व केतन ची हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी मयत केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी केली आहे. तसेच लग्नासाठी महाल बुक केला, विमाने बुक केली हे सर्व काल्पनिक व खोटं आहे असे विजय अग्रवाल यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते मात्र लग्नाचे ठिकाण अद्याप ठरलेले नव्हते असे ते म्हणाले.आरोपी पोलिसांच्या ताब्यातया क्रूर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी प्रियकर चेतन चौधरी याच्यासह होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, न्यू एरा सोसायटी समोर, बिबवेवाडी, पुणे) हिला देखील ताब्यात घेतले आहे. ते दोघेही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात एकत्र होते. तेथे त्यांची मैत्री झाली होती. दोघांच्या कुटुंबाचे मार्केटयार्ड मध्ये दुकाने आहेत. त्यांना वडगाव न्यायालयात हजर केले असता 29 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या पथकाने केली कारवाईही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पो.नि. दिनेश तायडे, पोसई अभिजित सावंत, सपोनि मनोज पवार तसेच पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल कसबेकर, संजय पंडित, प्रशांत तरे, पवन कराड, सचिन गायकवाड, नंदा कदम, सुजाता कदम, शरयू बिरंबळे आणि लोणावळा ग्रामीणच्या पथकातील जय पवार, सागर शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाऊसाहेब पंड, समीर तांगडे व महिला पोलीस अंमलदार सागर धनवे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
लोणावळा : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे आणि धमकीवजा वक्तव्ये करणे अत्यंत गंभीर असून, यामुळे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचत आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वडगाव मावळ येथे तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी खासदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना व वडगाव मावळ पोलिसांना देण्यात आले.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान खपवून घेणार नाहीतहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पत्रकार संघाने म्हटले आहे की, पत्रकार हे समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रामाणिकपणे करत असतात. मात्र, सत्तेतील लोकप्रतिनिधींकडूनच जर अशा प्रकारे पत्रकारांना धमकावले जात असेल आणि त्यांचा अवमान केला जात असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांशी सन्मानाने वागण्याची अपेक्षा असताना अशी खालच्या पातळीची भाषा वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे.पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाचीपत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी, दबाव किंवा अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची प्रशासनाने कडक दक्षता घ्यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन देताना मावळ तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सचिव रामदास वाडेकर, कार्याध्यक्ष विशाल विकारी, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे. ज्येष्ठ पत्रकार व सदस्य मनोहर दाभाडे, रमेश जाधव, निखिल कवीश्वर, विलास भेगडे, रमेश कांबळे, चेतन वाघमारे, नितीन तिकोने, सतीश गाडे, रेश्मा फडतरे, शैलजा फुलकर, प्रभाकर तुमकर, संकेत जगताप, संजय हुलावळे, अतुल पवार, जगन्नाथ काळे, प्रफुल्ल ओव्हाळ, अंकुश दाभाडे, माऊली वाघमारे, अनिल घारे, राजेंद्र कांबळे, रामकुमार अग्रवाल, मनोज मोरे आदींचा समावेश होता. यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी खासदारांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करत एकजुटीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.लोणावळा शहर पत्रकार संघाकडून निषेध व कारवाईचे निवेदनलोणावळा शहर पत्रकार संघाकडून देखील खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करा या आशयाचे निवेदन लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी बोलताना अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली असून मारण्याची धमके देखील दिलेली आहे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने २१ जून जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विशेष योग शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व अनुभवले. या कार्यक्रमाला खालापूर पंचायत समितीच्या सदस्या प्रमिलाताई महेश पाटील, कोयना मराठा समाजाचे माजी अध्यक्ष विठ्ठलजी मोरे, जेष्ठ मार्गदर्शक एमडी चाळके, वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, अखिल सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक मरागजे, शामकांत सावंत, विलास सावंत, वडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा परिषद शाळा वडवळचे मुख्याध्यापक सुधाकर थळे तसेच हेल्प फाउंडेशन, उत्तम फुड्स, गोदरेज अँड बॉईज, टाटा स्टील, एपीएल गॅस आणि बॅकबेस्ट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, तसेच तणावमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष जगदीश मरागजे आणि योग शिक्षक सुधाकर थळे यांनी केले. उपस्थितांनी विविध योगासनांचा सराव करत निरोगी जीवनाचा संकल्प केला. उत्कृष्ट आयोजन आणि ओघवत्या समालोचनामुळे शिबिरात विशेष रंगत आली. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर मुसळे, प्रमोद सावंत, सचिव प्रवीण सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर मोरे, उपक्रम प्रमुख सचिन जाधव, ज्येष्ठ सल्लागार अनिल सावंत, गणेश सावंत, सचिन मरागजे, आशिष चाळके, रवींद्र मरागजे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.
