Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात सोमवारी दिवसभरात 275 मिमी पाऊस; तर 24 तासात 727 मिमी पावसाची विक्रमी नोंद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील 72 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांमध्ये तब्बल 275 किलोमीटर पाऊस झाला तर रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी

क्राईम-न्युज

Ketan Agarwal Murder Case l केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या पोलीस कोठडीत आणखी ५ दिवसांची वाढ; गुन्ह्याचे 'नाट्य रूपांतर' व पासपोर्टचा शोध घेणार

लोणावळा : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची भावी पत्नी सिया गोयल व तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज 29 जून रोजी संपत असल्याने त्यांना वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी ५ दिवसांची (३ जुलैपर्यंत) वाढ केली आहे. तपासातील अनेक महत्त्वाच्या आणि शिल्लक बाबींचा छडा लावण्यासाठी ही कोठडी मंजूर करण्यात आली आहे.सरकारी वकील आणि पोलिसांचा न्यायालयात जोरदार युक्तिवादसोमवारी दुपारी ठीक तीन वाजता दोन्ही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. ही मागणी करताना सरकारी वकील म्हणाले, गुन्ह्याचा कट आणि रेकी : आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, हा कट नेमका कुठे बसून रचला आणि त्यांनी लोहगडावर जाऊन आधी रेकी केली होती का? याचा तपास करणे बाकी आहे.प्री-वेडिंग शूट आणि पासपोर्टचे रहस्य : सियाला केतनसोबत बाली येथे प्री-वेडिंग शूटला जायचे नव्हते. याच कारणास्तव तिने पासपोर्ट फाडले होते. आता पोलिसांना या प्रकरणात केतनचा बेपत्ता असलेला पासपोर्ट शोधायचा आहे.गुन्ह्याचे नाट्य रूपांतर (Recreation) : गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी सियाप्रमाणेच आता चेतन चौधरीलाही घटनास्थळी (लोहगड किल्ला) घेऊन जाऊन गुन्ह्याचे नाट्य रूपांतर (सीन रिक्रिएशन) करायचे आहे. तसेच त्यांनी लोहगडावर आणखी कोणाशी संवाद साधला होता, याचा शोध घ्यायचा आहे.मोबाईल डेटा रिकव्हरी : केतनचा मोबाईल मृत्यूच्या काही काळानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असून, तो रिकव्हर करायचा आहे. आरोपींनी अनेक गोष्टी लपवून ठेवल्या असून त्या हस्तगत करणे गरजेचे आहे.या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करायचा असल्याने पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.आरोपींच्या वकिलांचा प्रतियुक्तिवाददुसरीकडे, आरोपी सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध केला. आरोपींना केलेली अटक कायद्याला धरून आहे का? आमचा अर्ज आधी दाखल करून घ्या, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.या प्रकरणातील तांत्रिक तपास, चौकशी आणि नाट्य रूपांतर आधीच झाले आहे. आता पुढील तपास पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची कोणतीही गरज नाही. केवळ केतनच्या आई-वडिलांच्या म्हणण्यावरून याला 'हत्या' म्हणता येणार नाही, हा दरीत पडून झालेला मृत्यू असू शकतो. तसेच हा गुन्हा जामीनपात्र स्वरूपाचा असल्याने कोर्टाने पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद व आरोपींच्या वकिलांनी केला.         दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने तपासातील शिल्लक बाबींचे गांभीर्य लक्षात घेतले. केवळ तांत्रिक तपास उरला नसून गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे (जसे की केतनचा पासपोर्ट आणि मोबाईल डेटा) हस्तगत करणे आणि गुन्ह्याचे मूळ शोधणे गरजेचे असल्याचे मानत, न्यायालयाने आरोपींची ३ जुलैपर्यंत म्हणजेच ५ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. आता या ५ दिवसांच्या वाढीव कोठडीत पोलीस या हाय-प्रोफाईल प्रकरणातील कोणते नवीन धागेदोरे समोर आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ

लोणावळ्यासह मावळात मुसळधार; भाजे गावातील 'स्वराज्य नगरी'ला पाण्याचा वेढा, स्थानिक तरुणांनी जीवाची परवा न करता १५ ते १६ जणांना वाचवले!

लोणावळा : लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दि. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या या अतिवृष्टीमुळे लोणावळा शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.     मावळ तालुक्यातील भाजे गावातील 'स्वराज्य नगरी' परिसराला या पावसाचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे या भागातील घरांना चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडला होता. पुराचे पाणी इतक्या वेगाने वाढले की, बघता बघता प्रत्येक घरामध्ये छातीपर्यंत पाणी शिरले. यामुळे घरात असलेले लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आतमध्येच अडकून पडले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक तरुणांचे धाडस आणि बचावकार्यपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाजे गावचे माजी सरपंच महेशभाऊ टकले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रताप गरवड, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे, सचिन खंडागळे आणि स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतानाही आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या सर्वांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू केले.      छातीइतक्या पाण्यातून वाट काढत या धाडसी पथकाने घरामधून लहान मुले आणि वृद्धांसह जवळजवळ १५ ते १६ लोकांना यशस्वीरीत्या आणि सुखरूपपणे बाहेर काढले. सुरक्षित बाहेर काढलेल्या सर्व नागरिकांची राहण्याची व खाण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून, संकटसमयी देवदूतासारख्या धावून आलेल्या या स्थानिक तरुण आणि लोकप्रतिनिधींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, लोणावळा आणि मावळ परिसरात पावसाचा जोर अद्याप कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

“आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती”; नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी खोपोली पोलीस सज्ज!

खोपोली (प्रतिनिधी) : “आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर प्रभावी नियंत्रणासाठी खोपोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग, प्रतिबंध आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी केले.महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या विशेष शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. विशाल नेहूल होते. आपत्तीसमयी त्वरित प्रतिसाद देणे, संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.सर्व यंत्रणांचा व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग        या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, यशवंती हायकर्स, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र संघटना आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, औद्योगिक क्षेत्रातील गॅस गळतीसारख्या आपत्ती आणि महामार्गावरील अपघात अशा विविध संकटांच्या वेळी कोणती उपाययोजना करावी, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला. “संकटावर करू मात, देऊ एकमेकांना खंबीर साथ” हा संदेश यावेळी उपस्थितांमध्ये प्रभावीपणे रुजवण्यात आला.मान्यवरांचे मार्गदर्शन आणि समन्वयाचे आवाहनशिबिरात खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, परिवहन सभापती किशोर पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन घरत यांनी आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग, आवश्यक समन्वय आणि सर्व घटकांनी एकत्रितपणे कसे कार्य करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस दलाकडे आधुनिक संसाधने सज्ज: डॉ. विशाल नेहूलअध्यक्षीय भाषणात डॉ. विशाल नेहूल म्हणाले की, "खोपोलीतील प्रशासन, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये संकटसमयी एकजुटीने कार्य करण्याची एक सशक्त परंपरा आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाला आधुनिक संसाधने आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे."'वेळेपूर्वीची तयारी' हेच प्रभावी शस्त्र: पोलीस निरीक्षक सचिन हिरेखोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात “प्रतिबंध, सावधगिरी आणि पूर्वतयारी” या त्रिसूत्रीवर भर दिला. ते म्हणाले की, कोणतेही संकट अचानक येते; मात्र त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वेळेपूर्वीची तयारी, जागरूकता आणि समन्वय हेच आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांनी सर्व घटकांना पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले.बचाव साहित्यांचे थेट प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनशिबिरादरम्यान पीएसआय पूजा चव्हाण यांनी खोपोली पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या आपत्कालीन संसाधनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनकडील विविध बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी नगरपालिकेची फायर ब्रिगेड व्हॅन, फायर मॅन बाईक, गोरखा व्हॅन तसेच स्वामिनी संस्थेची ॲम्ब्युलन्स यांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पीएसआय ज्ञानेश्वर एडवले यांनी केले.खोपोलीकरांचा खंबीर निर्धारआपत्ती व्यवस्थापनात वेळेवर मिळणारा प्रतिसाद, संसाधनांचे योग्य नियोजन, समन्वयाची मजबूत साखळी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या शिबिराने सर्वांना करून दिली. आगामी काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा धैर्याने व सक्षमपणे सामना करण्यासाठी खोपोली पोलीस आणि नागरिक पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

Mavalmaza android application

Coming soon..