Get in on
लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत, लोणावळा परिसरातून एका 21 वर्षीय तरुणाला एम.डी. (मेफेड्रॉन) या अमली पदार्थासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे �
लोणावळा : लोणावळ्यातील जागतिक ख्यातीप्राप्त 'कैवल्यधाम योग संस्थे'चे मानद सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'मोरारज�
लोणावळा : लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या 'पुराणिक सोसायटी' मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १:३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या एका बंगल्यातून मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले. लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. राहुल चोरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे शहरात विनापरवाना चालणाऱ्या बंगल्यांच्या व्यवसायावर आणि पर्यटकांच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व लोणार शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयुर आबनावे, भुषण कुंवर, राहुल चोरघे, प्रिती गवारी, प्राजक्ता सुतार, सतिश घोंगडे, तुषार शिंदे, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली.
लोणावळा : अधिक महिन्याचे औचित्य साधून अखंड मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने संत तुकाराम महाराज पादुका स्थान, वाकसई येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला मावळ तालुक्यातील विविध गावांतून आणि उदार देणगीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवासाठी जमा झालेल्या निधीतून खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहिली, तिचा विनियोग संप्रदायातील गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आणि समाजकार्यासाठी करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श निर्णय आयोजकांनी घेतला आहे.आजारी महाराजांना रोख मदत; दिंडी समाजालाही दिला हाततालुक्यातील परमार्थिक क्षेत्रात वर्षानुवर्षे निष्काम सेवा करणाऱ्या, परंतु सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या कीर्तनकार व भक्तांना या शिल्लक रकमेतून प्रत्येकी १०,००० रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यामध्ये ह.भ.प. नवनाथ महाराज ठाकर (माळेगाव), ह.भ.प. सोमनाथ महाराज सावंत (देवले), ह.भ.प. विलास महाराज कुंभार (औंढे) याचा समावेश आहे. यासोबतच, मावळ तालुका दिंडी समाज यांना स्वतःची हक्काची जागा खरेदी करता यावी, या उदात्त हेतूने संप्रदायाच्या वतीने तब्बल १ लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत देण्यात आली आहे.ॐ चैतन्य वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या कार्याचे कौतुक या संपूर्ण उपक्रमात आणि महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात 'ॐ चैतन्य वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ' यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि दिशादर्शक ठरले आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम करून न थांबता, आपल्याच क्षेत्रातील गरजू सहकाऱ्यांना आणि संस्थेला अशी मोठी मदत उभी केल्याबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यातून या मंडळाचे मनापासून आभार मानले जात असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वारकरी संप्रदायाचा हा मानवतावादी दृष्टिकोन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवून गेला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक मार्गावरील व्हॅली ब्रिज येथे किमी 03/600 या ठिकाणी बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान तीन कारचा साखळी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, फॉर्च्यूनर (MH 05 CH 3512), वेरणा (AP 39 LW 9979) आणि एक्सयुव्हि 300 कार क्रमांक MH 02 DZ 8640 ही वाहने मुंबईहून पुण्याकडे जात असताना किमी 03/600 वरील व्हॅली ब्रिज परिसरात आली असता हा अपघात घडला. यातील फॉर्च्यूनर कार अचानक तिसऱ्या लेनमध्ये थांबल्याने मागून येणाऱ्या वेरणा कारने तिला धडक दिली. त्यानंतर वेरणा कारच्या मागून येणाऱ्या एक्सयुव्ही गाडी MH 02 DZ 8640 या कारने वेरणाला धडक दिल्याने साखळी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हलवली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
