Get in on
लोणावळा : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान अंतर्गत लोणावळा शहरामध्ये 35 ठिकाणी लस केंद्र उभारत 6365 बालकांना आज पोलिओ लस पाजण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्य
लोणावळा : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात तब्बल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. रविवारी २८ जून रोजी दुपारनंतर अचानक ढगांच्या गडग�
लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वेग मिळाला आहे. १८ जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा नेमका माग काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आज (२८ जून) आरोपींना सोबत घेऊन लोहगड किल्ल्यावर 'सीन रिक्रिएशन' (घटनेचे प्रात्यक्षिक) केले. यावेळी मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना कडक पोलीस बंदोबस्तात किल्ल्यावर नेण्यात आले होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक राजेंद्र मायणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक सकाळी सात वाजताच दोन्ही आरोपींना घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले.असा रचला हत्येचा थरार…गडाच्या पायथ्यापासून ते थेट मुख्य घटना स्थळापर्यंत १८ जून रोजी नेमकं काय घडलं, याचा प्रत्येक क्षणाचा घटनाक्रम पोलिसांसमोर पुन्हा उभा करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी खालील बाबींचे प्रात्यक्षिक करून घेतले:1)किल्ल्यावर चढताना कोणत्या ठिकाणी सियाने तिचा मित्र चेतनला इशारा केला?2) मुख्य घटनास्थळी पोहोचल्यानंतर सिया नेमकी कशी खाली बसली?3) केतनला गाफील ठेवून त्याला दरीत कशा पद्धतीने ढकलण्यात आले? या संपूर्ण प्रक्रियेची अचूकता तपासण्यासाठी पोलिसांनी एका मानवी आकाराच्या पुतळ्याचा देखील वापर केला. पुतळा दरीत ढकलून हत्येची ती भयंकर पद्धत पडताळून पाहण्यात आली.अपघाताचा बनाव; पण पोलिसांच्या चाणाक्षतेने गुन्हा उघड१८ जून रोजी केतन अग्रवाल या तरुणाचा लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय तपास केला असता, हा अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला पूर्वनियोजित खून असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिच्या मित्राच्या (चेतन चौधरी) मदतीने हा कट रचला होता. या खुलाशानंतर संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.साखरपुडा झाला, पण लग्न करायचे नव्हते!पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचा विवाह ठरला होता व चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्नाला वरवर होकार दिला असला तरी सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. याच कारणातून तिने केतनचा काटा काढण्याचे ठरवले. धक्कादायक बाब म्हणजे, केतनला संपवण्यासाठी तिने तब्बल तीन वेळा त्याला लोहगड किल्ल्यावर आणले होते आणि अखेर १८ जून रोजी तिने आपल्या मनसुब्यात यश मिळवले.१५ जणांची चौकशी, पुराव्यांना मिळणार बळकटीकेतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कमालीची गोपनीयता आणि तत्परता दाखवली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याशी संबंधित असलेल्या जवळपास १५ संशयित व्यक्तींची आतापर्यंत चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज करण्यात आलेल्या सीन रिक्रिएशनमुळे न्यायालयात या गुन्ह्याची साखळी सिद्ध करण्यासाठी आणि आरोपींविरोधातील पुराव्यांना कायदेशीर बळकटी मिळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.
लोणावळा : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे आणि धमकीवजा वक्तव्ये करणे अत्यंत गंभीर असून, यामुळे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचत आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वडगाव मावळ येथे तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी खासदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना व वडगाव मावळ पोलिसांना देण्यात आले.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान खपवून घेणार नाहीतहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पत्रकार संघाने म्हटले आहे की, पत्रकार हे समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रामाणिकपणे करत असतात. मात्र, सत्तेतील लोकप्रतिनिधींकडूनच जर अशा प्रकारे पत्रकारांना धमकावले जात असेल आणि त्यांचा अवमान केला जात असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांशी सन्मानाने वागण्याची अपेक्षा असताना अशी खालच्या पातळीची भाषा वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे.पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाचीपत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी, दबाव किंवा अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची प्रशासनाने कडक दक्षता घ्यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन देताना मावळ तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सचिव रामदास वाडेकर, कार्याध्यक्ष विशाल विकारी, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे. ज्येष्ठ पत्रकार व सदस्य मनोहर दाभाडे, रमेश जाधव, निखिल कवीश्वर, विलास भेगडे, रमेश कांबळे, चेतन वाघमारे, नितीन तिकोने, सतीश गाडे, रेश्मा फडतरे, शैलजा फुलकर, प्रभाकर तुमकर, संकेत जगताप, संजय हुलावळे, अतुल पवार, जगन्नाथ काळे, प्रफुल्ल ओव्हाळ, अंकुश दाभाडे, माऊली वाघमारे, अनिल घारे, राजेंद्र कांबळे, रामकुमार अग्रवाल, मनोज मोरे आदींचा समावेश होता. यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी खासदारांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करत एकजुटीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.लोणावळा शहर पत्रकार संघाकडून निषेध व कारवाईचे निवेदनलोणावळा शहर पत्रकार संघाकडून देखील खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करा या आशयाचे निवेदन लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी बोलताना अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली असून मारण्याची धमके देखील दिलेली आहे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने २१ जून जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विशेष योग शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व अनुभवले. या कार्यक्रमाला खालापूर पंचायत समितीच्या सदस्या प्रमिलाताई महेश पाटील, कोयना मराठा समाजाचे माजी अध्यक्ष विठ्ठलजी मोरे, जेष्ठ मार्गदर्शक एमडी चाळके, वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, अखिल सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक मरागजे, शामकांत सावंत, विलास सावंत, वडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा परिषद शाळा वडवळचे मुख्याध्यापक सुधाकर थळे तसेच हेल्प फाउंडेशन, उत्तम फुड्स, गोदरेज अँड बॉईज, टाटा स्टील, एपीएल गॅस आणि बॅकबेस्ट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, तसेच तणावमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष जगदीश मरागजे आणि योग शिक्षक सुधाकर थळे यांनी केले. उपस्थितांनी विविध योगासनांचा सराव करत निरोगी जीवनाचा संकल्प केला. उत्कृष्ट आयोजन आणि ओघवत्या समालोचनामुळे शिबिरात विशेष रंगत आली. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर मुसळे, प्रमोद सावंत, सचिव प्रवीण सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर मोरे, उपक्रम प्रमुख सचिन जाधव, ज्येष्ठ सल्लागार अनिल सावंत, गणेश सावंत, सचिन मरागजे, आशिष चाळके, रवींद्र मरागजे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.
