Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात ऑगस्ट अखेरपर्यंत 204 इंच पावसाची नोंद; 1 सप्टेंबर रोजी 24 तासात 19 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत 5193 मिमी (204.45 इंच) इतका पाऊस झाला आहे. 1 सप्टेंबर 2026 रोजी 24 तासात शहरात 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे.      लोणावळा शहरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस

Lonavala College News l विद्यार्थ्यांनो पदवीसोबत व्यावसायिक कौशल्य आत्मसात करूनच महाविद्यालयाबाहेर पडा : डॉ. पराग काळकर

लोणावळा : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून, पदवीसोबत व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक ज्ञान, भाषेवरील प्रभुत्व आणि समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मस

क्राईम-न्युज

मोठी चोरी l लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल लांबवला; अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळ्यातील वलवण बाराबंगला परिसरात एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोने-चांदीचे दागिने, हिरे आणि रोख रकमेसह एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:४५ ते ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास वलवण येथील 'गजल बंगलो, बाराबंगला' परिसरात घडली. अज्ञात चोराने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने बंगल्याच्या मागील कंपाउंडवरून आत प्रवेश केला. त्यानंतर पत्र्याच्या शेडवरून गॅलरीत जाऊन, गॅलरीचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी साह्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवज चोरून पोबारा केला. सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच दीड लाख रुपये रोख असे एकूण 14 लाख 15 हजार रुपयांची चोरी या ठिकाणी झाली आहे.       या प्रकरणी फिर्यादी निलेश श्रीकृष्ण वर्तक (वय ५६, रा. सह्याद्री फार्म्स, वलवण, लोणावळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (A) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (PSI) चंदनशिव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मावळ

एकविरा देवी मंदिरातील रोपवे प्रकल्प रद्द करण्यासाठी वेहरगाव-दहिवली ग्रामस्थांचा रास्ता रोको; मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला

लोणावळा : श्री क्षेत्र एकविरा देवी देवस्थान परिसरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच मंदिर परिसरात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला रोपवे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी वेहरगाव व दहिवली ग्रामस्थांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. पावसाची तमा न बाळगता महिला, पुरुष, तरुण तसेच लहान मुलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. वेहरगाव-दहिवली ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकविरा देवी मंदिराच्या पायथ्यापासून कार्ला फाट्यापर्यंत पायी भव्य मोर्चा काढला. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर ग्रामस्थांनी ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडताना, आमचा विकासाला विरोध नाही; मात्र प्रथम मंदिर परिसरातील प्रलंबित समस्या सोडवा. स्थानिक व्यावसायिक, रिक्षाचालक आणि अन्य व्यवसायांवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांचा रोजगार हिरावून घेणारा रोपवे प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. रोपवे प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्या हक्काचा रोजगार हिरावला जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रकल्प केवळ स्थगित न करता कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबितएकविरा देवी मंदिर परिसरात पायऱ्या, पायवाट, पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रश्नांबाबत संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कार्ला फाटा ते श्री आई एकविरा देवी मंदिर व गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी करण्यात आली. भाविकांसाठी सुरू असलेल्या पायऱ्यांच्या कामाची चौकशी करून ते काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणीदेवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी तसेच वादाचे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे देवस्थान परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करून आवश्यक पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली. भाविक व पर्यटकांसाठी शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पुरेशी आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. देवस्थान परिसरात अनधिकृत वाहतूक तसेच मद्यपान करून मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच वनविभागाच्या जागेतील वाहनतळ ग्रामपंचायतीकडे वर्ग करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.३ सप्टेंबरला सर्व विभागांची संयुक्त बैठकरास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांशी चर्चा केली. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. संबंधित सर्व शासकीय विभागांची संयुक्त बैठक गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.मागण्या मान्य न झाल्यास नवरात्रोत्सवात तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वेहरगाव-दहिवली ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.पोलीस बंदोबस्तामुळे कार्ला फाट्याला छावणीचे स्वरूपआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. लोणावळा विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कार्ला फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने या परिसराला काही काळ छावणीचे स्वरूप आले होते.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

गडचिरोलीत शिवसेनेचा भव्य मेळावा; उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला.     शिवसेना नेते व सचिव मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्तकमलाने जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. महेश केदारी यांच्यासह पक्षाचे राज्यातील व स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेले तालुकाप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे परिसर भगवामय झाला होता.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाला गती देण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पक्षाशी आणि ठाकरेंच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

Mavalmaza android application

Coming soon..