Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

मावळ माझा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शिवसेना परिवाराच्या वतीने वृक्षारोपण

लोणावळा : मावळ माझा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शहरात लोणावळा शिवसेना परिवाराच्या वतीने ठोंबरेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षी शिवसेना पक्षप�

भाजप लोणावळा शहर व नाणे मावळ मंडळाचा ‘कार्यकर्ता संकल्प मेळावा’ उत्साहात संपन्न!

संघटन बळकटीकरणासह शासकीय योजना घराघरांत पोहोचवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार; माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची प्रमुख उपस्थितीलोणावळा : भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर व नाणे मावळ मं

क्राईम-न्युज

राजमाची पॉईंटवरील पर्यटकाची चोरी उघड; लोणावळा शहर पोलिसांची धडक कारवाई; आरोपीसह २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : खंडाळा येथील प्रसिद्ध राजमाची पॉईंट परिसरात नाष्टा करत असलेल्या पर्यटकाचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.           तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत सुमारे २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर याला अटक करण्यात आली आहे.      लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील राजमाची पॉईंटवरील एका स्टॉलवर पर्यटक नाष्टा करत असताना त्याचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल कंपनीचे मोबाईल, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स आणि इतर साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २५ जुलै २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुगल पे व्यवहारांची माहिती आणि स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास केला. तपासादरम्यान संबंधित खातेदाराचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता मिळाल्यानंतर मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपी सध्या कल्याण येथील मानपाडा परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.          पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने लोणावळा शहर पोलिसांचे पथक मानपाडा पोलीस ठाणे, कल्याण येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून हरिदास बाळू कोळेकर याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने सदर चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल मोबाईल फोन, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा शाईन दुचाकी (क्रमांक : MH-03-FG-3349) असा एकूण २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.       ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार संदीप दगडू मानकर, पोलीस शिपाई नागेश कमठणकर, होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी केली.

मावळ

पवना बंदिस्त पाईप लाईनला मावळमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबरला विराट 'लॉन्ग मार्च'

पवनानगर : पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने ऐतिहासिक 'लॉन्ग मार्च' काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी देण्यास कोणताही विरोध नाही; मात्र नदीपात्राऐवजी थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याच्या निर्णयाला शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पामुळे पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होईल, शेतीसाठी तसेच मावळातील गावांच्या पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्या ऐतिहासिक ठिकाणाहूनच २ ऑक्टोबर रोजी पवना धरणाच्या दिशेने हा विराट 'लॉन्ग मार्च' सुरू होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.'भ्रष्टाचारासाठी प्रकल्प रेटला जात आहे'या प्रकल्पाच्या माध्यमातून काही लोकप्रतिनिधींना शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याची संधी मिळणार असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. विकासाच्या नावाखाली जनतेच्या हिताला डावलून हा प्रकल्प जबरदस्तीने लादला जात असल्याचे त्यांनी म्हटले.५६ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित१९७० पासून पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही निकाली न लागल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक पिढ्यांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू असतानाही शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला.उद्योगपतींसाठी जमिनी लीजवर देण्याचा आरोपपवना धरण परिसरातील शेकडो एकर जमीन उद्योगपतींना भाडेतत्त्वावर (लीज) देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही शेतकरी प्रतिनिधींनी केला. धरणग्रस्तांना न्याय नाकारला जात असताना उद्योगपतींना प्राधान्य दिले जात असल्याने मावळात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'लॉन्ग मार्च'मुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून, या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, प्रकाश तात्या बालवडकर, ज्ञानदेव सोनवणे, पवना धरण कृती समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

खंडाळा घाटातील डोंगरावर थरार ! दरीत तब्बल ५० फूट कोसळली कार; मृत्यूच्या दाढेतून महामार्ग पोलिसांनी चालकाला काढले बाहेर

खोपोली (प्रतिनिधी) : खालापूर तालुक्यातील गारमाळ रस्त्यावर आज (सोमवारी) सकाळी एका थरारक अपघाताची घटना घडली. दरीतील निसर्गरम्य दृश्य पाहण्याच्या मोहापायी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, महामार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसी बचाव मोहिमेमुळे चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.दृश्य पाहण्याचा मोह पडला महागमिळालेल्या माहितीनुसार, चालक मोहित स्वरूप भटनागर (वय ५१, रा. गुरुग्राम, हरियाणा) हे सोमवारी सकाळी गारमाळ रस्त्यावरून प्रवास करत होते. प्रवास दरम्यान कनेक्टिंग लिंकवरील ब्रिजचे विहंगमय दृश्य पाहण्याच्या मोहापायी त्यांनी कार कच्च्या रस्त्यावर घेतली. मात्र, अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. चार ते पाच पलट्या खात कार तब्बल ५० फूट खाली दरीत जाऊन पडली. अपघाताचे भयानक स्वरूप पाहून उपस्थितांनी चालक वाचण्याची आशाच सोडली होती.महामार्ग पोलिसांची धाडसी बचाव मोहीमघटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत खोल आणि धोकादायक दरीत उतरणे कठीण असतानाही महामार्ग पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे, संतोष गुजरवार आणि गोडसे या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या मोहित भटनागर यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.चालक सुखरूप; पोलीस दलाचे सर्वत्र कौतुकया भीषण अपघातात सुदैवाने चालक मोहित भटनागर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जर महामार्ग पोलिसांच्या मदतीला काही क्षणांचा जरी उशीर झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महामार्ग पोलिसांनी दाखवलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परतेमुळे एका नागरिकाचा जीव वाचला असून, या यशस्वी बचावकार्यासाठी महामार्ग पोलीस दलावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mavalmaza android application

Coming soon..