Get in on
लोणावळा : लोणावळा शहरात 01 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 102 मिमी (4.02 इंच) पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी लोणावळा शहरात उघडझाप पाऊस राहिला. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4231 मिमी (166.57 इं
लोणावळा : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून लोणावळा येथील तुंगार्ली भागातील 'श्री सदस्या' च्या वतीने बैठक हॉलच्या परिसरात वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. आपल्या सदगुरूप्रती कृतज्�
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनचालकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे औंढे गावाजवळील पुलानजीक 15 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी आपल्या ताब्यातील टेम्पोने पुण्याबाजूकडून मुंबईकडे जात असताना लघुशंकेसाठी एक्सप्रेसवेच्या कडेला वाहन थांबवले. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून पोबारा केला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4), 352 व 351(2) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा संदेश अंकुश हिलम (वय 23, रा. विनेगाव, बावदेववाडी, ता. खालापूर, जि. रायगड) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच 9 हजार 700 रुपये रोख रक्कम असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही उघड झाले असून त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोमपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार संतोष शेळके, अंजर मोमीन, सागर नामदास, गणेश होळकर, सिद्धेश पाटील तसेच पोलीस शिपाई भारत मोहोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
वडगाव मावळ : मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी रामदास वाडेकर (मावळ सत्य) आणि सचिवपदी गणेश विनोदे (पुढारी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुदेश गिरमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच वडगाव मावळ येथे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. हा सोहळा मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.एकमताने निवड आणि नियुक्तीपत्रांचे वाटपमावळ तालुका कार्यकारिणीच्या निवडीसाठी इच्छुकांकडून अर्ज व नावे मागविण्यात आली होती. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नावांना एकमताने मान्यता देण्यात आली. या पदग्रहण सोहळ्यात सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.नूतन तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:अध्यक्ष: रामदास वाडेकर (मावळ सत्य), सचिव: गणेश विनोदे (पुढारी), कार्याध्यक्ष: अतुल पवार (सा. अंबर), उपाध्यक्ष: जगन्नाथ काळे (पुढारी) व संकेत जगताप (लोकमत), सहसचिव: विशाल कुंभार (प्रभात), खजिनदार: नितीन तिकोणे (लोकमत), प्रकल्पप्रमुख: विशाल विकारी (मावळ माझा) व गणेश दुडम (चालता बोलता) कार्यकारिणी सदस्य : सचिन शिंदे (हॅलो मावळ), बंडू येवले (महाराष्ट्र टाइम्स), रेश्मा फडतरे (महाराष्ट्र लाईव्ह १), अंकुश दाभाडे (वृत्त छायाचित्रकार), प्रशांत पुराणिक (सा. अंबर), संजय हुलावळे (प्रभात), दक्ष काटकर (सकाळ), सुभाष भोते (पुण्यनगरी), भारत काळे (सकाळ) आणि माऊली वाघमारे (बारामती लाईव्ह).पदसिद्ध सदस्य व सल्लागार मंडळपदसिद्ध कार्यकारिणी सदस्य : मनोहर दाभाडे (अध्यक्ष, तळेगाव दाभाडे - प्रभात), विलास भेगडे (अध्यक्ष, प्रेस फाऊंडेशन - लोकमत), रमेश कांबळे (अध्यक्ष, देहूरोड - पुढारी), सतीश गाडे (अध्यक्ष, वडगाव मावळ - नवराष्ट्र), चेतन वाघमारे (अध्यक्ष, कामशेत - प्रभात) आणि रवि ठाकर (अध्यक्ष, पवनानगर - प्रभात).मार्गदर्शक व सल्लागार मंडळ: सुरेश साखवळकर (सा. अंबर), बबनराव भसे (सकाळ), सोनबा गोपाळे (केसरी), ज्ञानेश्वर वाघमारे (सकाळ), विवेक इनामदार (मावळ ऑनलाइन), सुदेश गिरमे (लोकमत) आणि निखिल कविश्वर (लोणावळा).पत्रकारांच्या हक्कासाठी संघटित होण्याचा निर्धारया पदग्रहण सोहळ्याला तालुक्यातील अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत पत्रकार उपस्थित होते. यात तालुका सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे, लोणावळा शहर अध्यक्ष नितीन तिकोणे, पवन मावळ अध्यक्ष रवि ठाकर, कामशेत अध्यक्ष चेतन वाघमारे यांच्यासह राधाकृष्ण येणारे, तात्यासाहेब धांडे, बाळासाहेब भालेकर, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर ठाकर, अनिल घारे, विशाल कुंभार, संदीप गाडेकर, संजय हुलावळे, सुभाष भोते, आकाश कानापुरम, महेश भागीवंत, अमित भागिवंत, अंकुश दाभाडे, श्रीकांत चेपे, राहुल सोनवणे, सोपान येवले, मंगेश आखाडे, चंद्रकांत असवले आदी मान्यवर उपस्थित होते.नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी व प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे व ताकदीने काम करण्याचा संकल्प या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लोणावळा : कार्ला येथील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर श्री ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक अजय शिराली यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. परिज्ञानाश्रमात स्वामीं समाधीची सेवा, कार्ला येथे विद्यार्थी वर्गाकरिता परीज्ञानाश्रम नावाचे विकास घर निर्मिती यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. परीज्ञानाश्रम विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रयत्नातून कार्ला एकवीरा मंदिर येथे प्रयोगशाळा निर्मिती झाली आहे. कार्ला परिसरात सामाजिक काम, शासकीय उपक्रम यात ते सक्रिय असत. गोरगरीब विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांचे शैक्षणिक शुल्क ते स्वतः भरत असत. श्री एकविरा जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे ते संस्थापक होते. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती सीमा, पुत्र रौनक व सून विजिता असा परिवार आहे.
