Breaking news
ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

ठळक बातम्या

लोणावळा

लोणावळ्यातील रायवुड परिसरातील बंगल्यात बेकायदेशीर घुसखोरी करून तुफान राडा; महिलांना मारहाण व तोडफोड प्रकरणी 28 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा शहरातील रायवुड परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे घुसून महिलांना मारहाण करणे, घरातील साहित्याची फेकाफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे आणि मध्यस्थीसाठी आलेल्या नगरसेव�

क्राईम-न्युज

पुणे ग्रामीण LCB ची मोठी कारवाई l लोणावळा परिसरात ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक; ७.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक हुंडाई आय-१० कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत कुसगाव येथील आयआरबी कार्यालय परिसरात एका कारमधून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित शुभम शर्मा हा कारमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० (क्र. एमएच १४ बीके ७२३५) कारची झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान पोलिसांना ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित शुभम शर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला होता. लोणावळा व मावळ परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

मावळ

कान्हे फाटा–टाकवे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; तातडीने दुरुस्तीची मागणी

कान्हे मावळ (प्रतिनिधी) : कान्हे फाटा ते टाकवे बुद्रुक या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अशोकभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ विभागाकडे निवेदन देत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. या वेळी उपाध्यक्ष बबन आलम, निरांजन चव्हाण, मोजेसदास भाई, अनिल लालगुडे, सुनील साळवे, ज्ञानेश्वर वाळुंजकर, शंकर गावडे, सुमीत गावडे, नाथा पिंपळे, आकाश पारखी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. कान्हे फाटा–टाकवे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.नवीन इंद्रायणी पुलाच्या दुरवस्थेचाही मुद्दाटाकवे बुद्रुक येथील नवीन इंद्रायणी पुलाच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच पर्यटकांची ये-जा होत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलनाची भूमिका लवकरच घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

गडचिरोलीत शिवसेनेचा भव्य मेळावा; उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला.     शिवसेना नेते व सचिव मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्तकमलाने जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. महेश केदारी यांच्यासह पक्षाचे राज्यातील व स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेले तालुकाप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे परिसर भगवामय झाला होता.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाला गती देण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पक्षाशी आणि ठाकरेंच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

Mavalmaza android application

Coming soon..