Breaking news

नांगरगाव – भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करा – डॉ. किरण गायकवाड

लोणावळा : लोणावळा शहरातील नागरिकांच्या अस्मितेचा विषय असलेल्या नांगरगाव भांगरवाडी या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला दिरंगाई होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मी लोणावळाकरचे डॉक्टर किरण गायकवाड यांनी केले आहे. डॉक्टर किरण गायकवाड म्हणाले सात कोटी रुपयांचा हा पूल आता पंधरा कोटी वर गेला आहे. ज्यांच्यामुळे या कामाला दिरंगाई झाली त्यांच्याकडून ही वाढीव रक्कम वसूल करण्यात यावी. कोणतेही नियोजन नसताना व उड्डाणपूलाचे खांब उभे करण्यासाठी जागा ताब्यात नसताना देखील ज्यांनी घिसाडघाई करत या कामाचे भूमिपूजन करत कामाला सुरुवात केली त्या सर्वांकडून ही वाढीव रक्कम वसूल करण्यात यावी. नियोजन शून्य कारभारामुळे या उड्डाणपुलाचे आराखडे अनेक वेळा बदल करावे लागले त्यामुळे सरळ असणारा हा पूल आता नागमोडी झाला आहे. तसेच पुलाची रुंदी देखील कमी झाली असल्यामुळे भविष्यकाळामध्ये याच पुलावर पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

       भांगरवाडी रेल्वे गेट या ठिकाणी स्थानिक नागरिकांना दैनंदिन मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे. अर्धा अर्धा तास हा केक उघडला जात नाही त्यामुळे दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. लोणावळा शहरातील वाहतुकीची ही समस्या सोडवण्यासाठी सदर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा ठराव 2005 सारी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्ष कामाला 2019 साली सुरुवात झाली. ते देखील काम करताना पुलाचे कोणतेही नियोजन करण्यात न आल्याने सदरचा पूल हा तांत्रिक अडचणीमध्ये सापडल्यामुळे मागील तीन ते चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूलाच एका इमारतीला याच कालावधीमध्ये बांधकामाची परवानगी देण्यात आली. 

     मागील सहा ते आठ महिन्यापासून या तांत्रिक अडचणी सोडवत सदरच्या पुलाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न मावळचे आमदार सुनील शेळके व लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हाधिकारी पुणे हे देखील 5 जून रोजी या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. पुलाच्या कामासाठी आवश्यक असणारी जागा भूसंपादित करण्याचा मार्ग बहुतांशी सुटत आला आहे. असे असले तरी ज्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदरच्या पुलाचे काम रखडले व सात कोटी रुपये खर्च असलेला पूल आज 15 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या वाढीव खर्चाला जे जबाबदार आहेत त्यांच्याकडून सदरची रक्कम वसुली केली जावी अशी मागणी डॉक्टर किरण गायकवाड यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दोन्ही उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.

इतर बातम्या